आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-डास निर्मूलनाबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात यावा ग्रामस्थांची मागणी.
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव वार्ताहार
डास निर्मूलनाबाबत सातत्याने ग्रामसभेत विषय घेऊनही या विषयाकडे ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही. आपल्या गावात डासांच्या त्रासामुळे कोणाच्याही घरी पाहुणा मुक्कामी थांबत नाही. वर्षातून किती वेळा डास निर्मूलनाची फवारणी करायची याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात यावा व तो सर्वानुमते संमत करण्यात यावा अशी मागणी राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत लावून धरत प्रथम यावर चर्चा घेण्याचा आग्रह केला
सरपंच शशिकांत पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत खेळी मेळीच्या वातावरणात विविध विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली.
ग्रामसेविका कविता आहेर यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम केले.
रोहिदास चेचरे म्हणाले की मागील
ग्रामपंचायत बॉडीने माझ्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे. गावातील एकही व्यक्ती जर ग्रामपंचायत क्लार्क या पदासाठी घ्यायचा नव्हता तर मग गावातील दुसऱ्या व्यक्तीला या पदावर का घेतले ? असा ही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला
किरण चेचरे यांनी ठराव मांडताना म्हणाले कि ६० ते ७० वर्षांपूर्वीची जी जुनी घरे मोडकळीस आली आहे त्यांची घरपट्टी रद्द करण्यात यावी,
गावामध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरधक बसविण्यात यावे संध्याकाळच्या वेळेस सुसाट वेगाने काही तरुण गावातून जात येत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी मागणी साईनाथ चेचरे यांनी केली
सीसीटीव्ही कॅमेरे कनेक्टिव्हिटी व व्यवस्थित न बसवल्यामुळे एखाद्या दुर्घटने संदर्भात सीसीटीव्ही कॅमेरे पाहायला गेलो तर त्यात व्यवस्थित दिसत नाही त्या संदर्भात दखल घेण्यात यावी अशी मागणी मा. सरपंच गणेश चेचरे यांनी केली
गावातील बाजाराचा ठेका गावातीलच व्यक्तीला देण्यात यावा बाहेरच्या व्यक्तीला देण्यात येऊ नये. अशी मागणी अमित चेचरें महेश चेचरे यानी केली,
संजय चेचरे यांनी आमच्या शेतात जाण्यासाठीच्या रस्याचा प्रश्न उपस्थित केला,यावेळी माजी संचालक भाऊसाहेब चेचरे म्हणाले स्मशानभूमीपासून ते टेकावडे वस्ती ते बाभळेश्वर लगत पाटाच्या कडेने रस्त्याची कामे होणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे.
राजेंद्र चेचरे व किरण चेचरे यांनी कालव्याच्या बाजूने असणारा जुना वहिवाट रस्ता जलसंपदा विभागाकडून मजबूतीकरण करण्याची सूचना केली
ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे त्याच प्रभागातील सदस्य समिती नेमून वसुली करण्यासाठी ग्रामसेवक मॅडम यांना सहकार्य करावे अशी सूचना दत्तात्रेय चेचरे यांनी मांडली .
नवसाजी पाटील चेचरे यांच्या वस्तीवर नाली गटार योजनेचे काम करण्यात यावे अशी सूचना बळीराम चेचरे मांडली.
, साठवण तलाव व स्मशानभूमी कामासंदर्भातची सविस्तर माहिती माजी संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी दिली
यावेळी ॲड बाबासाहेब चेचरे. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे. माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. लहानू चेचरे. उपसरपंच दौलत चेचरे. माजी सरपंच गणेश चेचरे. सुरेश चेचरे सतीश गिरमे. तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे. अण्णासाहेब चेचरे, उपसरपंच दौलत चेचरे. दत्तात्रय चेचरे. ह भ प संदीप महाराज चेचरे. महेश चेचरे. शरद चेचरे .संजय चेचरे. राजेंद्र इनामके स्वप्निल इनामके बळीराम चेचरे. अशोक चेचरे दिलीप चेचरे. रवींद्र चेचरे कृष्णा चेचरे. बाळासाहेब चेचरे. रोहिदास चेचरे. संतोष माघाडे. नंदू कदम रावसाहेब चेचरे. सौ अनिता गिरमे बाळासाहेब दरंदले. शुभम चेचरे दीपक चेचरे. महेश चेचरे. गणेश गायकवाड. रघुनाथ दरंदले आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.