महिलेच्या क्रूर कृत्याने सहा-ही मुलांचा मृत्यू.
प्रतिनीधी:- मन्सूर मुजावर रायगड

महिलेच्या क्रूर कृत्याचे सहा-ही मुलांचा मृत्यू
रायगड, दि. 31 (मन्सूर मुजावर) : खरवली- बोरगाव मध्ये महिलेने स्वतःच्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत टाकल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील खरवली- बोरगाव मध्ये दुर्देवी घटना घडली असून महिलेने पोटाच्या सहा मुलांना विहिरीत टाकले असून सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. या क्रूर महिलेबद्दल संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ,आज सायंकाळच्या दरम्यान महाड तालुक्यातील बोरगाव हद्दीतील विहिरीत सध्या वास्तव्यासाठी महाड तालुक्यत असलेल्या उत्तर प्रदेश येथील रूना साहनी या महिलेने घरामध्ये भांडण झाल्याने राग मनात घेऊन आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत टाकून दिले असून त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरून टाकणारी ही घटना घडली आहे.
यानंतर त्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जावून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केली असल्याची माहिती प्राप्त झाली असून स्थानिकांच्या मदतीने चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे.