मायणी परिसरात मुसळधार पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान___शेतकरी हातबल.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
मायणी परिसरात मुसळधार पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान___शेतकरी हातबल.
मायणी प्रतिनिधी मायणी परिसरात मंगळवार दिनांक अकरा रोजी झालेल्या मुसळधार पावसाने फारच नुकसान झाले असून शेतकरी हतबलझाल्याचे दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की रब्बी हंगामात सर्वसाधारणपणे विजयादशमीच्या जवळपास शेतकरी पेरण्याकरता ते. या हंगामात ज्वारी बाजरी गहू हरभरा करडई इत्यादी अन्नधान्याची पिके घेतली जातात खरीप हंगामाच्या वेळी पेरणीला उशीर झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडला त्यामुळे पीक काढणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कडधान्याच्या पिकाला आलेल्या शेंगा झाडावरच कुजून गेल्या तसेच घेवड्या सारख्या पिक रानातच कुजले त्यामुळे उत्पन्न निकृष्ट दर्जाच्आल्याने बाजारपेठेतील दर पडला अशाच अवस्थेत शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढून रब्बी हंगामाच्या पिकाची तयारी केली परंतु दिनांक 10 ऑक्टोबर व 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पिकांची उगवण होणार तर नाहीत परंतु. उगवन झाली तर पिके पिवळी पडणार त्याच्यावर करपा तांबेरा पडणार असल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे
खरीप हंगामाच्या पेरण्या जुलै च्या शेवटच्या आठवड्यात झाल्या पण मुसळधार पावसाने सर्वच पिकेवाया गेली. आता रब्बी हंगाम ही वाया जातोय की काय अशी अवस्था झाली आहे याला म्हणतात आई जेवली ना व बाप भीक मागू देईना अशी स्थिती निर्माण झाली