परळी:-(सातारा)-जांभे जमीन प्रकरणी मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याची मागणी….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जांभे जमीन प्रकरणी मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याची मागणी….
परळी दि: सातारा तालुक्यातील जांभे येथील सर्वे नंबर ३० ही मिळकत बाबत जुन्या दस्तऐवज प्रमाणे मालकी हक्क असणाऱ्या व्यक्तीला सदरच्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहाराचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून२०१०साली व्यवहार झाला आहे. असे असताना जांभे येथील काही व्यक्ती कोणत्याही मालकी हक्काचे पुरावे सादर न करता शासकीय कार्यालयात अर्ज करत आहेत. त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी श्री रमेश कावेडिया व इतरांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, फेरफार क्रमांक ३९ अन्वये सीताबाई परशुराम भवनजी राजेमहाडिक यांची जमिनी बाबतची नोंद कायम केलेले आहे. सन २०१० पर्यंत राजे महाडिक हे मालक व वहिवाटदार होत्या. त्यानंतर त्यांचे वारसदार यांच्या नावाने ही मिळकत रमेश कावेडिया व इतर यांनी ११ ऑक्टोबर २०१० रोजी कायम खुश खरेदी केली आहे. याबाबत सहाय्यक दुय्यम निबंधक सातारा क्रमांक एक यांच्या कार्यालयात दस्त नोंदवलेला आहे. तसेच फेरफार क्रमांक ४३२ अन्वये रमेश कावेडिया व इतर यांच्या नावाची नोंद सातबारा सदरी मालकी कब्जेदार म्हणून झालेली आहे.
त्यापूर्वी दिनांक आठ नोव्हेंबर १९८५ रोजी फेरफार क्रमांक २३८ अन्वये तारळी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जांभे गावातील काही सर्वे नंबर हे कोणत्याही प्रकारचे हस्तांतर करू नये. असा शेरा मारला आहे. तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी सर्वे नंबर ३० येथील मिळकत तारळी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे हस्तांतर दाखल्याची गरज नाही. याचा उल्लेख करून दिनांक ११ नोव्हेंबर २०१० रोजी दस्त नोंदवल्याचा खुलासा केलेला आहे.
याबाबत वादीने कुलमुखत्यार धारक यांच्या वतीने दिवाने न्यायालयात दावा दाखल केला होता. तो दावा न्यायालयाने ना मंजूर केला आहे. याची अनेक कारणे देण्यात आलेली आहेत.
सातारा आवृत्तीतील एका दैनिक वृत्तपत्रामध्ये 127 ग्रामस्थांच्या वतीने कुलमुखत्यार असलेल्या श्री कदम यांनी जाहीर प्रकटन देऊन ३० नोव्हेंबर २००५ रोजी जांभे ग्रामस्थांना कळविले आहे. सदरची जमिनी कधीही खालसा न होणारी आहे. तसेच ही मिळकत पहिल्यापासून खडकपड, गवतपड असल्याने याला कोणीही वादी कुळ म्हणता येणार नाही. असेही स्पष्ट केले आहे. कोणताही लेखी पुरावा दाखल न केल्यामुळे न्यायालयाने वादी यांचा अर्ज ना मंजूर केला. सातारा जिल्हा न्यायालयातही वादी यांचे अपील सुद्धा ना मंजूर केले आहे. केवळ जमीन मालकांना आर्थिक आणि मानसिक नाक त्रास देण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या सरकारी कार्यालयामध्ये अर्ज देऊन शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप सदर जमिनीचे मालक व कब्जेदार रमेश योगराज कावेडिया यांनी केला. आवश्यक सर्व पुरावे सुद्धा सदर अर्जाच्या कागदपत्रासोबत जोडले आहेत. दरम्यान, याबाबत जांभे ग्रामस्थांची बाजू ऐकून घेण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.