वाई:-( कळंबे )-शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – श्री शेंडे
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – श्री शेंडे
सध्या वातावरणातील बदल लक्षात घेता शेतीतील उत्पन्न हे खूप अनिश्चित स्वरूपाचे झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान अवलंब करण्यासोबतच जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर द्यावा यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना यासारख्या योजनेची जोड घेऊन प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल करावी व गावांमध्ये जास्तीत जास्त लघु उद्योजक तयार व्हावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री प्रशांत शेंडे यांनी केले. कळंबे येथे खरीप हंगाम मोहीम कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
” शेतातील उत्पन्न आपण घेतच असतो परंतु त्यासोबतच त्याला एखाद्या प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्यास शेतकऱ्याला अधिकचे आर्थिक उत्पन्न मिळू शकेल तसेच त्यांचे आर्थिक राहणीमान सुद्धा उंचावेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.” असे आवाहन ही श्री शेंडे यांनी केले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री तानाजी यमगर यांनी सोयाबीन हळद ऊस या पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन सुद्धा केले. सोयाबीन लागवड करताना सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के बीज प्रक्रिया करूनच सरीवर टोकन पद्धतीने किंवा बीबीएफ पद्धतीनेच असेही श्री यमगर यांनी सांगितले. सोयाबीन बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता कशी करावी याचे प्रात्यक्षिक ही यावेळी दाखवण्यात आले
मंडळ कृषी अधिकारी श्री रवींद्र बेलदार यांनी यावेळी कृषी विभागाचे विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
यावेळी उप कृषि अधिकारी श्री निखिल मोरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री योगेश वंजारी, कळंबे गावचे सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,प्रतिष्ठित नागरिक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.