साताऱ्यातील एस.टी.फेऱ्या रद्द व उर्मट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिवसैनिकांनी घेतले हाती मशाल..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यातील एस.टी.फेऱ्या रद्द व उर्मट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिवसैनिकांनी घेतले हाती मशाल..
सातारा : रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी महायुतीच्या राज्य शासनाकडून साताऱ्यात लाडकी बहिण लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित केला.या निमित्त ग्रामीण भागातील महिलांना फक्त वाहन व्यवस्था करून सभा मंडपात आणले. कोणतीही पूर्व सुचना न देता एस. टी. महामंडळाने अचानक सातारा जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त एस टी गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या. याचा जाब विचारण्यासाठी सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हाती मशाल घेतली आहे. जर या उर्मट अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
सातारा जिल्हयातील नागरीकांचे वेळापत्रक कोलमडल्यानंतर एस.टी. बस स्थानकात एकच
गोंधळ निर्माण झाला. मुंबई- पुणे सारख्या ठिकाणावरून गावाकडे जाणाऱ्या व गावाकडून जिल्हा अथवा तालुक्याच्या ठिकाणी येवून काम करणारे प्रवासी, रुग्ण, विद्यार्थी व दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साठी खरेदीसाठी येणारे महिला व नागरिक यांची
प्रचंड गैरसोय झाली. एका बाजूला घोषणाचा पाऊस पाडत आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड महागाई वाढ होत आहे. महिलांचा अपमान करून त्यांची मानहानी केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
गोरगरिब जनतेला एस.टी. बस सेवा फार महत्वाची
असल्याने नागरीक या सेवेवर बहुतांशी अवलंबून असतात. एस टी महामंडळाने कोणतीही पूर्व सुचना
न देता सातारा बस स्थानकातील अचानकपणे अनेक एस.टी.बस रद्द झाल्याने गोंधळ निर्माण झाला. याचा लोकशाही मार्गाने जाब विचारण्यासाठी शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते व काही पत्रकार सातारा बस आगारात
गेलो असता एका उर्मट अधिकाऱ्याकडून एस टी महामंडळाची बदनामी झालेली आहे. याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. तसेच प्रवासी यांच्याशी सुध्दा
अत्यंत उर्मटपणे वागण्यात आले आहे. एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला.
अनेकांशी अर्वाच्छ भाषेत बोलण्यात आले.मुळातच प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या या एस.टी. महामंडळाची बदनामी संबंधित उर्मट अधिकारी यांच्याकडून झालेली आहे.या सर्व प्रकाराची चौकशी
करण्यात येवून कोणाच्या आदेशाने पुर्व सुचना न देता. वरील प्रकार घडला आहे. तसेच जनतेशी व पत्रकाराशी उर्मटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरीत कारवाई करण्यात यावी. यासाठी त्याच दिवशी सातारच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना तातडीने कळविण्यात आलेले आहे.त्यांनी कारवाईचे वचन दिले असले तरी सामान्य माणसाची नळ असणाऱ्या शिवसेना (उबाठा गट)वतीने
येत्या २७ ऑगस्ट रोजी सातारा बसस्थानक परिसरात तीव्र निदर्शने करण्यास येतील.यामूळे कोणतेही शासकिय नुकसान झाल्यास या कृत्याला पाठीशी घालणारे सातारा जिल्हा प्रशासन जबाबदार असेल. असे निवेदनात नमूद केले असून निवेदनाची प्रत सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांना देण्यात आलेले आहे.