सातारा:-सातारचा ,,सा ,,माहित नाही असे काही उत्साही थेट प्रचारात…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारचा ,,सा ,,माहित नाही असे काही उत्साही थेट प्रचारात…..
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रात क्रांती केली. आजही महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सातारा केंद्रबिंदू ठरलेला आहे. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सातारा जिल्हा भूषवत आहे. त्याच सातारा जिल्ह्यात आता हवसे , नवसे, गवसे व साले – बोले हे मतदारांना पक्षीय मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी काही प्रचारक थेट प्रचारात उतरले आहेत..त्यांना सातारचा ,,,सा,,, तरी माहित आहेत का ? अशा तिखट शब्दात ज्येष्ठ नागरिक व महिला त्यांची खिल्ली उडवू लागलेले आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोना काळात झालेले हाल, धरणग्रस्तांचे निघणारे मोर्चे, वाढती गुंडगिरी, रस्त्यावर चालणे सुद्धा अशक्य, वाढती बेरोजगारी, दलितांवरील अत्याचार या सर्व घडामोडी बाबत सातारकर हे आपापल्या परीने जाब विचारतात. प्रसंगी संघर्ष करतात. असे अनेक संघर्ष नायक सातारा जिल्ह्यामध्ये चळवळ उभी करून लोकशाही जिवंत ठेवत आहेत. पण, पक्षीय राजकारणामुळे हे संघर्ष नायक सध्या प्रचारात गुंतले आहेत. अशा मंडळींनी निवडणूक प्रचार निमित्त खेड्यापाड्यात भेट देऊन लोकांना आपण केलेल्या कामाची पोहोच पावती मागत आहेत. त्यांचे लोक मनापासून स्वागत करून त्यांचे विचार शांत ऐकत आहेत. शेवटी प्रत्येकानेच मतदान करावे. यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी लोकशाही मार्गाने विनंती करत आहे.
कोपरा सभा, पदयात्रा, कार्यकर्ता मेळावा, संपर्क अभियान, व्यक्तिगत गाठीभेटी या माध्यमातून आता निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात दिसत आहे. ओळखीचे चेहरे ,सुखदुःखात धावून येणारे चेहरे आणि काही अनोळखी चेहरे ज्यांना सातारच्या भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास, राजकीय गणिते माहीत नाहीत. अशी मंडळी आता स्वतःचे ज्ञान पाजळवण्यासाठी सातारा भूमी म्हणजे सब भूमी गोपाल की… समजू लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड उत्तर ,कराड दक्षिण, जावळी, सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव अशा मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावातील दहा-पंधरा टोळके हे गावाला त्रासदायक ठरत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी अशा मंडळींना हाताशी धरून व त्यांचे लाड करून प्रचारात सोडले जात आहेत. सोशल मीडियावर ज्यांना देशाची पॉलिसी माहित नाही. जाहीरनाम्यातील काही वाक्य माहीत नाहीत. अशी मंडळी फुकट मिळालेल्या नेटच्या पैशातून ग्रुप मध्ये इतरांना डोकेदुखी ठरू लागलेली आहेत. जशा पद्धतीने मोकाट सांड रस्त्यातील शांतताप्रिय वाहन चालकांना त्रासदायक ठरतात. तसे काही हे सांड आता गावोगावी डोकेदुखी ठरू लागलेली आहेत.
हवसे, नवसे, गवसे तर काही बिन बुलावा महिमान हे प्रचारानिमित्त सातारा जिल्ह्यात येऊन चमकोगिरी करत आहेत. त्याहीपेक्षा विनोदाचा भाग म्हणजे या भागात त्या नेत्यांची भाषणामुळे तालुक्याची तोफ धडाडली. तमक्याच्या भाषणाने लोक प्रभावित झाले .तालुक्याच्या मार्गदर्शनाने वातावरण बदलले. असं काही नाही. बिदागी घेऊन काही प्रचारक उतरले आहेत. पूर्वी सभेपूर्वी लोकांना मनोरंजन करण्यासाठी कला पथक सादर करत होते. आता लोकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रमुख वक्त्याची भाषणे होत आहेत. असे दिवस पाहण्यास मिळालेले आहेत.
लोकशाही खूप सुदृढ झालेली असून प्रत्येक घरटी मतदार आहेत. त्यामुळे लोकशाहीने केलेल्या काय द्या चे बोला. असाच नारा उच्चभ्रू वस्तीमध्ये ऐकण्यास मिळत आहे. हे या निवडणुकीचे अवमूल्यन ठरू लागले आहे. दुसऱ्या बाजूला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातारा जिल्हा परिषदेने मतदानाची टक्केवारी वाढावी. या चांगल्या भावनेतून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी रॅलीचे नियोजन केले होते. असे नियोजन आपापल्या भागात लोकांनी करून मतदानात जनजागृती करावी अशी अपेक्षा आहे. हे काम प्रामाणिक व सामाजिक कार्यकर्ते नित्यनेमाने करत आहेत. हा राष्ट्राचा गौरव ठरला आहे.