मेढा- जावळी एकतर्फी लढत वाटचाल आता तुल्यबळ लढतीकडे…?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा – जावळी एकतर्फी लढत वाटचाल आता तुल्यबळ लढतीकडे…?
मेढा दि: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी व महायुती आणि वंचित बहुजन आघाडी सह अपक्ष यांची तयारी सुरू झालेली आहे. यामध्ये सातारा- जावळी मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापुढे शिवसेना उबाठा गटातून युवा नेते अमित दादा कदम यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सातारा- जावळीची एकतर्फी लढत आता तुल्यबळ लढतीच्या दिशेने होणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे.
२००८ नंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना एक लाख २७ हजार १४३ मते मिळवली होती. त्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ९७ हजार ७६४ मते मिळवून ४७८१३ मताधिक्याने ते विजयी झाले होते. आणि २०१९ साली एक लाख १८ हजार पाच म्हणजेच ४३४२४ मताधिक्याने ते भाजपचे आमदार झाले होते. या तिन्ही निवडणुकीत त्यांना फारसा राजकीय मुद्दा घेऊन लढावे लागले नाही. अनेकांची त्यांना साथ मिळत होती.
२०२४ च्या निवडणुकीत राजकीय समीकरण बदलल्यामुळे राजकीय मुद्दे बाजूला झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने विकास कामाबाबत मतदारांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात विकास झाला की नाही? याचा जाब विचारणार असल्याचे संकेत मिळू लागलेले आहेत. विकास कामे केल्याचे प्रसारमाध्यमातून अनेकदा लोकांनी वाचले आहे. पाहिले आहे. पण आता ठेकेदारांचे मसीहा अशी प्रतिमा झाल्याने अनेक गावात निकृष्ट दर्जाचे कामे झाल्याची टीका होताना दिसत आहे.
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, शहरातील नागरी सुविधांचा प्रश्न व वाढती गुन्हेगारी व ठेकेदारी असे मुद्दे या निवडणुकीकडे चर्चेला येऊ शकतात.
महायुतीसाठी जमेची बाजू म्हणजे सातारा लोकसभेच्या निवडणुकीत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते . त्यांना या निवडणुकीत फारशी अडचण निर्माण होणार नाही. परंतु, शिवसेनेचेच उबाठा गटात प्रवेश केलेले जावळीचे सुपुत्र श्री अमित कदम यांना उमेदवारी मिळाल्याने जावळीकरांच्या मनामध्ये अस्मिता जागी करण्यास पुरेसे ठरले आहे.
श्री अमित कदम यांचे वडील जी. जी. कदम यांनी जावळीचे आमदार म्हणून चांगले काम केले असले तरी त्यांचा शिवसेनेचे सदाशिव सकपाळ यांनी पराभव केला होता. आता अमित कदम यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस असल्यामुळे त्यांना प्रचार यंत्रणा राबवताना फार ताण-तणाव सहन करावा लागणार नाही. मुळातच दीपक पवार यांना उमेदवारी मिळाली नसल्याने या ठिकाणी बंड होण्याची शक्यता फार कमी आहे. दुसऱ्या बाजूला सातारा शहर परिसरात महाविकास आघाडी बद्दल लोकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फारसं मताधिक्य मिळणार नाही. ते उघडपणे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अमित कदम यांनी अनेक राजकीय पक्ष बदलून उबाठा शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली असली तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा अनेक पक्ष बदलण्याचे उदाहरण महाविकास आघाडीचे प्रचारक आत्तापासूनच सांगत आहेत. त्यामध्ये ही तथ्य आहे. एकूणच या निवडणुकीत महाविकास आघाडीचा करिष्मा दिसल्यास नवल वाटणार नाही. अशी परिस्थिती आहे. दिया और तुफान अशी निवडणूक असल्याचे टॅगलाईन जावळी खोऱ्यात घुमू लागलेली आहे.