सातारा:-साताऱ्यात मॅरेथॉन स्पर्धा हाफ ,पण स्थानिकांचा बुडतोय रोजगार फुल ,,,?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात मॅरेथॉन स्पर्धा हाफ ,पण स्थानिकांचा बुडतोय रोजगार फुल ,,,?
सातारा दि: सातारा परिसरामध्ये नैसर्गिक रित्या समृद्धी प्राप्त झालेल्या यवतेश्वर घाटामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये हौशी धावपटूंसाठी दरवर्षी हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात येतो. त्याचा अनेकांना त्रास होत असून स्थानिक गरीब व कष्टकरी लोकांचा रोजगार बुडत असल्याबाबत चर्चा होताना दिसत आहे. किमान गोरगरिबांच्या गावात जाऊन त्यांच्या रोजगाराबाबतची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी. अशी आता मागणी पुढे आलेली आहे.
रविवार हा सातारा शहरातील बाजाराचा दिवस असल्यामुळे येवतेश्वर पिसानी, आटळी, सांबरवाडी, जांभळ मुरे , अनावळे, पेट्री, अंबानी देवकल, एकिव , कास, बामणोली आधी छोट्या मोठ्या गावातून काही शेतकरी बांधव तांदूळ, नाचणी, रानभाज्या, दूध, कोंबड्या, शेळी, कडीपत्ता , गवती चहा आधी घरगुती व शेती विषयक पीक साहित्य विक्रीसाठी आणतात. त विक्री झाल्यानंतर बाजारहाट करून ते आपापल्या घरी जातात. परंतु, हौशी धावपटूंसाठी हा रस्ता सकाळी पाच ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुकीत बदल केलेला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून हा बदल केला असला तरी कायद्याप्रमाणे अनेक गोष्टी न्यायालयाने स्पष्ट केल्या आहेत. उदाहरणे द्यायचे असेल तर कास पठारावरील अतिक्रमण काढण्याबाबत उपयुक्त सूचना केलेले आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही .हे खास करून नमूद करावे वाटत आहे.
सातारा शहरातील काही रस्त्यांबाबत पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना वगळून इतर सर्वच वाहनांना बंदी घातल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस त्याची अंमलबजावणी करतील. याबद्दल कुणाचे मनात शंका नाही.
परंतु ,औद्योगिक वसाहत व रोजगारासाठी घरातून बाहेर पडणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांना या हाफ मॅरेथॉनचा नेमका किती फायदा होणार ? हे गुलदस्त्यात असून सध्या कायद्याच्या चाकोरीत राहून आपला हेतू साध्य करणारी काही प्रवृत्ती साताऱ्यात सामान्य माणसांना गृहीत धरून वागू लागलेले आहेत .हे आता स्थानिक भूमिपुत्र व काही सामाजिक कार्यकर्त्यांना खटकू लागलेले आहे.
जर हौशी धावपटूंसाठी जर रस्ता बंद करायचा असेल तर त्यासाठी स्थानिकांच्या अभिप्राय व सूचना घेऊन त्याबाबत अंमलबजावणी करणे. हे लोकशाहीचे संकेत आहे. मात्र, हे संकेत पाळले जात नाही. ज्या शेतकऱ्यांचा रोजगार बुडणार आहे. त्यांचे नुकसान भरपाई कोण देणार ? याचा कधीही कोणी विचार केलेला नाही. धावपटूंच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी कोणाचाही विरोध नाही. जर खरोखरच धावपटूंसाठी जर स्पर्धा घ्यायची असेल तर सातारा जिल्ह्यातील अनेक डोंगराळ भागांमध्ये निर्जन्य रस्ते आहेत. या रस्त्यावर स्पर्धा आयोजित केली तर कुणाचे नुकसान होणार नाही. याचाही आता गांभीर्याने विचार करणे गरजेची वाटू लागले आहे. दरम्यान रविवारी होणाऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमुळे किमान शंभर ते दीडशे कुटुंबीयांना आपल्या रोजगाराला मुकावे लागलेले आहे त्यांच्या तळतळात कुणाला लागू नये हीच माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे सध्या वाढती बेरोजगारी व नैसर्गिक संकट यामुळे पिंजलेल्या लोकांना दररोज जगण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे त्यांच्यासाठी किमान चार पावले दूर जाऊन त्यांच्या जगणं सुसह्य करावे यासाठी आता कुणीतरी स्पर्धा घ्यावी अशी नम्र विनंती स्थानिकांनी केली आहे.
————————————————-
फोटो कॅप्शन प्रतिनिधी स्वरूपातील हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे छायाचित्र