सातारा:-कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करतांना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
सातारा.दी 26
कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करतांना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
सातारा.दी 26
कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करतांना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचे देखील स्मरण केले. आज २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, सैनिक कधीही माजी होत नसतो. याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच त्याच्या कल्याणासाठी आम्ही महत्वाचे निर्णय घेतलेत..शासनाने माजी सैनिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. खारघर इथं माजी सैनिकांचं विश्रामगृहही उभ करणार आहोत. मेस्कोचे विविध उपक्रम, माजी सैनिकांना रोजगार संधी, त्यांच्या वेतनातील तफावती दूर करणार आहोत. मुंबईमध्ये युद्ध संग्रहालय करण्याचा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यातल्या अपशिंगे मिलीटरी गावातील विकास कामांना प्राधान्य देण्याचं ठरवलंय. माजी सैनिकांना टोलमधून सवलत आणि असे अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत. वीर जवानांच्या कुटुंबांची काळजी घेण्यासाठी येत्या काळात आणखी काही महत्वाचे निर्णयही आपण घेणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.